सोलापूर महानगरपालिकेच्या ठिसाळ कारभारामुळे एका दहा वर्षीय मुलाचा विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी लष्कर भागात घडली .पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या दहा वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली. कुंभार गल्ली परिसरात राहणाऱ्या दहा वर्षीय शांतराज युवराज तल्लोर असे या मृत मुलाचे नाव आहे. नळाला पाणी कमी-दाबाने येत असल्यामुळे तल्लोर कुटुंबीयांनी नळाला मोटार लावली होती पाणी भरल्यानंतर मोटारीचे विद्युत कनेक्शन काढण्यासाठी गेलेल्या शांतराज याला विजेचा जोराचा धक्का बसला. या घटनेनंतर त्याला उपचारासाठी आई वडिल आणि शेजाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना कळताच हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.